उद्योजकता विजडमलेखमालिका

यश मिळवण्यासाठी कल्पकता व डोकं शांत पाहिजे

चीनमधील एक प्रसिध्द दंतकथा आहे. एक क्रूर सम्राट राजा चुंग लुई, चीनमधील एका मागून एक लहान राज्यं काबिज करतो. ‘तुम्ही मला शरण या, नाहीतर मरणाला सामोरे जा ‘असा त्याचा आदेश असे. काही छोट्या राजांनी लढून प्राण गमावले, तर काही जीवाच्या भीतीने शरण येऊन गुलाम झाले. जेव्हा चुंग लुईचे आक्रमण मींगझु या राणीच्या राज्याच्या सीमेवर येऊ ठेवलं, तेव्हा राणी मिंगझुला काय करावं सुचेना, इतक्या बलाढ्य राजासमोर आपला टिकाव लागणार नाही, तेव्हा आपल राज्य वाचवायचं कसं याची तिला चिंता लागली.

e4f03370 1689 42f5 91ef cd74870f0c36

राणी नकाशा घेऊन तंबूत आली. तो गोल गुंडाळलेला होता. तिने तो टेबलावर ठेवला आणि हळूहळू उघडू लागली, राजाची उत्सुकता वाढीस लागली, किती खजिना मिळतोय ह्या विचारानं तो आनंदी झाला होता, पण चाणाक्ष राणीने त्या नकाशात धारधार तलवार लपवून आणली होती, नकाशा उघडताच राणीने तलवार काढली व राजाच्या ध्यानीमनी नसताना त्याचे शीर धडावेगळे करुन त्याचा वध केला. सगळीकडे हाहाकार माजला, सैन्य पळू लागले. राणीच्या सैन्यांनी हल्ला चढवून लुईचे सैन्य पळवून लावले व अशा रीतीने राणी मींगझुने आपले राज्य वाचवले.

आज मराठी माणसाकडे मोठे भांडवल नाही, खूप चांगले शिक्षण नाही, अनुभव नाही. उद्योग व व्यवसाय करायचा म्हटलं तर बलाढ्य भांडवलदार यांच्याशी स्पर्धा आहे. तेव्हा आपण आपला उद्योग अशा कल्पक आयडिया शोधून शांत डोक्यानं केला पाहिजे. चाणाक्षपणे गनिमी काव्यानं विजय मिळविण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. डोकं शांत ठेवलं, तरंच ते चालेल आणि आयडिया सुचतील.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button