← मुख्य पानावर परत जा
मुख्य पानआर्थिक घडामोडीआर्थिकसावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…
आर्थिक

सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

ना
नवी अर्थक्रांती
|
२७ मे, २०२६
|
२ मिनिटे वाचन
|
१,५२० वाचले
सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

मित्रांनो तुम्ही EMI वेळेवर भरला नाही तर बँक थेट तुमचा मोबाईल लॉक करणार? तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळं बंद होणार का? जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन किंवा टॅबलेट EMI वर घेतला असेल, हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमागची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि बँकांसाठी एक नवा मसुदा तयार केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोन फायनान्सच्या क्षेत्रात काही फिनटेक कंपन्या आधीपासूनच तंत्रज्ञानाचा वापर करून फोन लॉक करत होत्या, पण आता आरबीआयने यावर अधिकृत शिक्कामोर्तब करत ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अतिशय कडक नियमावली आणली आहे.

अनेकांना गैरसमज असेल कि एक EMI मिस झाला की फोन बंद पडेल, पण असं अजिबात नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, कर्ज थकून जोपर्यंत ९० दिवस म्हणजेच ३ महिने पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बँक कोणतेही ठोस पाउल उचलू शकत नाहीत. ६० दिवस उलटल्यावर बँक पहिली नोटीस देईल ज्यासाठी २१ दिवसांचा वेळ मिळेल. त्यानंतर ७ दिवसांची लास्ट वॉर्निंग नोटीस दिली जाईल. मात्र बँक तुमचा फोन पूर्णपणे लॉक करू शकत नाही. इनकमिंग कॉल्स, इंटरनेट, इमर्जन्सी SOS आणि सरकारी अलर्ट्स चालूच राहतील. फक्त काही अ‍ॅप्स किंवा फीचर्स ब्लॉक केले जाऊ शकतात. तसेच बँक तुमच्या फोनमधील गॅलरी, फोटो किंवा कॉन्टॅक्ट्स अजिबात पाहू किंवा स्टोअर करू शकत नाही.

एवढंच नाही तर, जर ग्राहकाने थकीत रक्कम भरली, तर बँकांना अवघ्या १ तासाच्या आत मोबाईल अनलॉक करावा लागेल. जर बँकेने चुकीच्या पद्धतीने फोन लॉक केला किंवा पैसे भरूनही अनलॉक करण्यास उशीर केला, तर बँकेला ग्राहकाला दर तासाला २५० रुपये या दराने भरपाई द्यावी लागेल. थोडक्यात काय तर हा नियम ग्राहकांना त्रास देण्यासाठी नाही, तर रात्री-अपरात्री येणारे रिकव्हरी एजंट्सचे फोन आणि त्यांची अरेरावी थांबवण्यासाठी आहे. त्यामुळे वेळेवर EMI भरा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला RBI चा हा नियम कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!

संबंधित लेख (Related Articles)

शेअर मार्केट प्राथमिक ज्ञान: नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करावी?
आर्थिक नियोजन

शेअर मार्केट प्राथमिक ज्ञान: नवीन गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू करावी?

२४ जून २०२६१ मि.
वाचा
निर्यात उद्योग: कृषी माल विदेशात कसा निर्यात करावा? जाणून घ्या परवाना मिळवण्याची प्रक्रिया
टुरिझम

निर्यात उद्योग: कृषी माल विदेशात कसा निर्यात करावा? जाणून घ्या परवाना मिळवण्याची प्रक्रिया

३० जून २०२६१ मि.
वाचा
हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी; जाणून घ्या उत्तम संस्थांची यादी
विद्यार्थींसाठी खास

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी; जाणून घ्या उत्तम संस्थांची यादी

३० जून २०२६१ मि.
वाचा
मत्स्य शेती व्यवसाय: तलावामध्ये मत्स्य शेती कशी सुरू करावी? जाणून घ्या लागणारे भांडवल आणि शासकीय अनुदान
शेतीपूरक व्यवसाय

मत्स्य शेती व्यवसाय: तलावामध्ये मत्स्य शेती कशी सुरू करावी? जाणून घ्या लागणारे भांडवल आणि शासकीय अनुदान

२५ एप्रिल २०२६१ मि.
वाचा
सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम… - नवी अर्थक्रांती